याचिकेमुळे वाढल्या बच्चूभाऊंच्या अडचणीत वाढ!!!
शासनाच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री बच्चू कडू यांनी यंत्रणांचा गैरवापर करून निधी वळवल्याचा आरोप वंचित आघाडीने केल्यानंतर बुधवारी फौजदारी याचिकाच न्यायालयात दाखल केली. यावर १ जानेवारीला सुनावणी होणार असून, या याचिकेमुळे पालकमंत्री कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत.जिल्हा नियोजन समितीने वार्षिक आराखडा तयार करताना मागवलेल्या प्रस्तावानुसार १० मार्च २०२१ रोजी जि. प. च्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेवून ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव समितीकडे पाठवला होता.
मात्र जि. प. कडून समितीकडे पाठवलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावात परस्पर बदल केले. शासनाच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री बच्चू कडू यांनी यंत्रणांचा गैरवापर करून निधी वळवला. शासनाच्या १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार करण्याच्या उद्देश बोगस कागदपत्र केले, असा आरोप वंचित आघाडीने केला होता. याप्रकरणी ३ डिसेंबरला शुक्रवारी शहर कोतवाली स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र कारवाई न झाल्याने 'वंचित'तर्फे पालकमंत्री बच्चू कडूंविरुद्ध फौजदारी संहिता १५६ (३) अंतर्गत प्रकरण न्यायालयात दाखल केले आहे. याचिकार्त्यांकडून अॅड. आशिष देशमुख कामकाज पाहत आहेत.
0 टिप्पण्या