अल्प संख्याक हक्क दिन दिवस साजरा
आज दि.18/12/2020 शनिवार रोजी स्व,रामकृष्ण आढे कला/वाणीज्य उच्च माध्यमिक विद्यालय केळीवेळी, ता.अकोट जी.अकोला येथे अल्प संख्याक हक्क दिवस दिवस साजरा करण्यात आला, तरी सर्व कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मा.प्राचार्य श्री.रत्नदीप थोरात सर यांच्या आदेश आणि मार्गदर्शनानुसार ठरविण्यात आला असून, कार्यक्रमाचे योग्य असे सूत्रसंचालन वीद्यालयाचे सहाय्यक अध्यापक श्रीधर कुमार भदे सर यांनी केले. तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आणि अध्यक्ष अश्या दोन्ही भूमिका मा.प्राचार्य सरांनी पार पडल्या.
तसेच कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करीत श्री.भदे सर यांचे प्रास्तविकानंतर 12.वीच्या विध्यार्थिनी कु.कोमल बावणे आणि कु.पायल भटकर दोघींनी अल्प संख्यांकाच्या हक्क या मुद्द्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्राचार्य सर यांनी देशाचे संविधान,बहुसंख्याक, अल्पसंख्याक मूलभूत हक्क,आधारभूत हक्क या अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकून त्याचा विध्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडून कार्यक्रमांची सांगता झाली. तरी कार्यक्रमाला विद्यालयाचे सहायक अध्यापिका राऊत मॅडम, सहायक अध्यापक बी.एम.चक्रनारायण सर, तसेच श्री.भदे सर तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी हजर असून,12.विच्या विध्यार्थी विध्यार्थिनींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम योग्य रित्या पार पाडला करिता सर्व विध्यार्थी विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
अल्पसंख्याक हक्क दिन: स्वतःच्या हक्क रक्षणासाठी जागरुकतेने पुढे या-जिल्हाधिकारी निमा अरोरा
अकोला, दि.१८ (जिमाका)- अल्पसंख्याकांनी आपल्या हक्कांबाबत जागरुक असले पाहिजे. मात्र स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी तसेच आयुष्यात स्वतःला हवं ते मिळविण्यासाठी स्वतः जागरुक होऊन प्रत्येकाने पुढे यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे केले. अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘अल्पसंख्याक यांना त्यांचे घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात करण्यात आले होते.
या कार्याक्रमाला कार्यक्रमाला जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार,निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अधीक्षक मिरा पागोरे, जेष्ठ विधीज्ञ ॲड. मोहम्मद डोकाडिया,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाअध्यक्ष पी.जे. वानखडे, सचिव डॉ. एम.आर.इंगळे, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष सोहेल परवेज अली, सचिव अलिम देशमुख व ॲड. प्राचार्य सरफराज नवाज खान, अल्पसंख्याक सामाजिक संघटना फोरमचे जुबेर नदीम खान, श्रीमती सोमय्या अलि, आलिया मॅडम, ॲड. नजीब शेख, अल्पसंख्याक शिक्षक संघटनेचे जव्वाद हुसेन आदी मान्यवर तसेच अल्पसंख्याक समुदायातील विविध संघटनांचे प्रतिनिधी. विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.
आपल्या संबोधनात जिल्हाधिकारी अरोरा यांनी सांगितले की, सर्व अल्पसंख्याक समुदाय आपल्या हक्कांबाबत जागरुक राहून आपले हक्क स्वतः मिळवू लागतील, अशा तऱ्हेने मुख्य प्रवाहात सामिल होतील त्यादृस्ह्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे आहे. शिक्षणाद्वारे आपण हवं ते मिळवू शकतो. त्यासाठी आपण आपले हक्क स्वतः मिळविण्यास शिकले पाहिजे, त्यासाठी स्वतः पुढे आले पाहिजे. यासाठी निव्वळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.
आपल्या भाषणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी, समाजात सर्व घटकांनी एकजुटीने राहणे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन करुन आपत्तीच्या प्रसंगी एकत्र येणाऱ्या अकोल्यातील सर्व समाज घटकांचे अभिनंदन केले. सहभागी वक्त्यांनी अल्पसंख्याक समुदायांच्या विकासासाठी शासनाने तयार केलेल्या योजना सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याबाबत प्रशासनाने तसेच अल्पसंख्याक समुदायातील सर्व घटकांनी मिळून प्रयत्न करावे, असे मत मांडले.प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले तर सूत्रसंचालन शितल शर्मा यांनी केले. गजानन महल्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 टिप्पण्या