शहिद एसटी कर्मचारी वारसदारांना त्वरित मोबदला देण्यात यावा
अकोला
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांची संप सुरू असून आतापर्यंत 49 एसटी कर्मचारी शहीद झाले त्यांच्या वारसदारांना त्वरित मोबदला देण्यात यावा तसेच विलिनीकरण करण्याची मागणी मंजूर करण्यात यावी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना लाल परी ची सेवा त्वरित उपलब्ध करून द्यावी अशी आग्रहाची मागणी अकोला जिल्हा भाजपा आमदार व अकोला पूर्व चे अभ्यासू आमदार रणधीर सावरकर यांनी मुंबई येथील विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला . परिवहन महामंडळातील मृतांच्या वारसांना मोबदला देणे तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांना निय फळमित वेतन व वैद्यकीय देयके मिळण्याबाबत प्रश्न क्रमांक ३२५१८ राज्याचे ३४ आमदारासह अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी प्रश्न उपस्थित करून राज्य परिवहन महामंडळातील कमी वेतन, वेतन नियमित न मिळणे व अन्य आर्थिक समस्यांमुळे माहे मार्च, २०२० पासून ऑक्टोबर, २०२१ पर्यंत २३ कर्मचाऱ्यांनी, तसेच संगमनेर (जि.अहमदनगर) येथील एका एसटी चालकाने वेतन न मिळाल्यामुळे दिनांक २० सप्टेंबर, २०२१ रोजी आणि शेवगाव रजत (जि.अहमदनगर) परिवहन महामंडळाच्या आगारातील वाहन चालक श्री.दिलीप हरिभाऊ काकडे यांनी दि.९ ऑक्टोबर २०२१ रोजी एस.टी च्या मागील बाजूस गळफास लावून आत्महत्या केली तसेच कोरोनामुळे राज्यातील सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला असून अद्याप एकाही कर्मचाऱ्याच्या वारसाला नोकरीत सामावून घेण्यात आलेले नाही तसेच केवळ दहा कर्मचाऱ्यांच्या वारसांच पन्नास लाख रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे, महामंडळ तोट्यात असल्याने या कर्मचा-यांचे वेतन तसेच वैद्यकीय बिले काढण्यास महामंडळाकडून दिरंगाई केली जात आहे, महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या महागाई व घर भाडे भत्यामध्ये वाढ केली असली तरी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलिनीकरण करण्याची मुख्य मागणी मान्य न केल्याने कामगार संयुक्त कृती समितीने उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केल्यानंतरही राज्यातील अनेक आगारे बंद असल्याची व काम बंद आंदोलन सुरू आहे. राज्य परिवहन मंडळाचे संपावर गेलेल्या ३७६ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आहे या बाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने कर्मचाऱ्यांना प्रलंबित आणि नियमित वेतन व वैद्यकीय देयके मिळणे, कोरोना व इतर कारणांमुळे मृत झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी, अनुदान व इतर देय रक्कम देणे तसेच कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याबाबत कोणती कार्यवाही/उपाययोजना केल्या व केली नसल्यास , विलंबाची कारणे काय आहेत ?
परिवहन मंत्री ना. अॅड. अनिल परब यांनी सदर प्रश्नांच्या उत्तरात नमूद केले की राज्य परिवहन महामंडळातील एकूण ३३ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. तथापि, आत्महत्येची कारणे वेगवेगळया स्वरुपाची व भिन्न आहेत. तसेच, श्री.दिलीप हरीभाऊ काकडे यांनी दि.२९.१०.२०२१ रोजी बसचे पाठीमागील बाजूस गळफास लावून आत्महत्या केली आहे. सदर प्रकरणी शेवगांव पो.स्टे. दैनंदिनी मध्ये अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. (२) कोविड-१९ संबंधित कर्तव्य बजावतांना ३०३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. _कोरोनामुळे मृत पावलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या वारसांपैकी २२२ अवलंबितांनी अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी अर्ज केलेले असून त्यापैकी एकूण ३४ अवलंबितांचे अनुकंपा तत्त्वावरील नोकरीची प्रकरणे मंजूर करुन आतापर्यंत १० वारसांना नोकरी देण्यात आली आहे व उर्वरीतांना रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार नेमणुक देण्यात येत आहे. १९ अवलंबितांनी नोकरी ऐवजी रु.१० लाख इतके आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत अर्ज केले असून, त्यापैकी ०६ अवलंबितांची रु.१० लाख इतके आर्थिक सहाय्य मिळणेबाबतची प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. ८१ अवलंबित हे शिक्षण घेत असल्याने, त्यांनी त्यांचा नोकरीचा हक्क राखून ठेवलेला आहे व १२० अवलंबितांनी अद्याप कागदपत्रांची पुर्तता केली नसल्याचे आपल्या उत्तरात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दि.०१.०६.२०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये कोविड-१९ संक्रमणाच्या कालावधीत प्रत्यक्ष प्रवाशांच्या संपर्कात येणारे राज्य परिवहन कर्मचारी म्हणजेच चालक/वाहक, चालक तथा वाहक, वाहतूक नियंत्रक, सहा.वाहतूक निरीक्षक व सुरक्षा रक्षक यांचा कोवीड-१९ च्या संक्रमणामुळे मृत्यू झाल्यास त्यांना रु.५० लाखांचे विमा कवच/सानुग्रह सहाय लागू करण्यात आले आहे. कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या १० कर्मचा-यांच्या वारसांना अटी व शर्तीच्या अधीन राहून रु ५० लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मृत्युमुखी पडलेल्या परंतु, रु.५० लाखाचे विमा कवच/ सानुग्रह सहाय्यापासुन शासन निकषामुळे पात्र न ठरलेल्या रा.प.अधिकारी व कर्मचा-यांच्या कुटुंबियांच्या वारसांना अटी व शर्तीच्या अधीन राहून रु.५ लाख आर्थिक मदत देण्याबाबत महामंडळाचे परिपत्रक दि.३०.०९.२०२१ अन्वये सर्व विभाग/ घटकांना सुचना प्रसारित करण्यात आल्या आहेत.
कोविड-१९ या आजाराच्या संसर्गामुळे राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्न घटल्याने कर्मचाऱ्यांची वैद्यकिय बिले व वेतन विलंबाने होत होते, तथापी, राज्य शासनाने दिलेल्या आर्थिक मदतीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात येत असून, माहे नोव्हेंबर २०२१ अखेर पर्यंतचे वेतन महामंडळातील अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत कोणतेही वेतन प्रलंबित नसून, निधीच्या उपलब्धतेनुसार वैद्यकिय बिलांची देयके अदा करण्यात येत आहेत. राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या विलिनीकरणाच्या मागणीच्या अनुषंगाने मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या आदेशानुसार त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून, समितीचे कामकाज १२ आठवडयात पूर्ण करून त्याचा अहवाल मा.मुख्यमंत्री, महोदयांना सादर करावा व मा.मुख्यमंत्री, महोदयांनी त्यांचे मत/शिफारशीसह मा.उच्च न्यायालय, मुंबई यांना सादर करावा, असे निर्देश मा.उच्च न्यायालयाने दिलेले असल्याचे त्यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे. आमदार सावरकर यांनी प्रवाशांना होणारा त्रास एसटी कर्मचाऱ्यांची समस्या याबद्दल राज्य शासन उदासीन असल्याची टीकाही करून आजाद मैदानात व राज्यभरात एसटी कर्मचारी संप करत असून त्यांच्या बदल्या त्यांच्यावर धमक्या देण्याचा प्रकार या राज्यात सुरू आहे. लोकशाही हाय की नाही असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटक आंध्र प्रदेश या धरतीवर एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे
दूर संचार टेलीफोन अकोला जिल्हा सल्लागार समितीची बैठक
अकोला
माजी केंद्रीय राज्य मंत्री व खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या निर्देशानुसार दूर संचार टेलीफोन अकोला जिल्हा सल्लागार समितीची बैठक सोमवार दिनांक 27 डिसेंबर रोजी बीएसएनएल ऑफिस येथे होत असून ग्रामीण भागातील समस्या व अकोला शहरातील समस्या संदर्भात तसेच वाशिम जिल्ह्यातील समस्या यावर चर्चा होणार असल्याची माहिती भाजपा प्रसिद्धीप्रमुख दूरसंचार समितीचे सदस्य गिरीश जोशी यांनी दिली.
बीएसएनएल संदर्भात असलेली तक्रार व सेवे संदर्भात असलेली तक्रार लेखी स्वरुपात भाजपा कार्यालयात भाजपा सरचिटणीस माधव मानकर यांच्याकडे देण्यात यावी तसेच याबाबत तक्रारी टेलीफोन सल्लागार समिती सदस्य व भाजपा लोकप्रतिनिधींकडे 26 डिसेंबर पर्यंत रविवार पर्यंत द्यावी जेणेकरून त्या समस्येवर चर्चा विनिमय होऊन मार्ग काढण्याचा दृष्टीने खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात बीएसएनएल ग्राहकांना सेवा उत्तम प्रधान करण्याच्यादृष्टीने व त्यांच्या तक्रारी निवारण करण्याच्या दृष्टीने मदत होईल यासाठी ग्रामीण भागातील तसेच शहरातील उद्योजक नागरिक ज्येष्ठ नागरिक तसेच शैक्षणिक संस्था यांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात भाजपा कार्यालयात द्यावी अशी विनंती जिल्हा भाजपा प्रसिद्धीप्रमुख व अकोला जिल्हा दूरसंचार सल्लागार समिती सदस्य गिरीश जोशी यांनी देऊन खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वात ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न प्रामाणिक करता येईल असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे
0 टिप्पण्या