Ticker

6/recent/ticker-posts

700 शेतकऱ्यांचा बळी घेतल्यानंतर घमंडी राजाला झाली उपरती!

700 शेतकऱ्यांचा बळी घेतल्यानंतर घमंडी राजाला झाली उपरती!


प्रतिनिधी मनोज भगत
दिनांक 20 नोव्हेंबर 2021

अकोला:-शेतकऱ्यांनी पण खुरपे हाती घेतले आहे.आता 'कमळा'चे उच्चाटन होणारच शेतकरी आंदोलन 1 वर्ष, 3 महिने व 1 आठवडा म्हणजे 465 दिवस सुरु आहे यात 700 शेतकऱ्यांचा बळी गेलाय आंदोलन करणाऱ्यांचे अन्न व पाणीही तोडले होते वृद्ध आंदोलकांची औषधेही  पोहचू दिली नाहीत रस्त्यावर खंदक खोदले व सर्व साधनसामुग्री थांबवली खलीस्तानी म्हणून आंदोलकांच्या कुटुंबियांवर गावागावत केसेस दाखल केल्या पाण्याचे फवारे मारले,अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केला,डोकी फुटूपर्यंत लाठीमार केला, भोजनातून विषबाधा करण्याचा प्रयत्न केला,खोटे एडिट केलेले व्हिडिओ पसरवून कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न केला दलाल मिडियाचा वापर करून हे आंदोलन पाकिस्तान आणि चीन पुरस्कृत आहे असा कांगावा केला आंदोलक शेतकऱ्यांच्यात फूट पाडण्याकरिता करोडो रुपयांचा चुराडा केला पण अखेर शेतकऱ्यांचा विजय झाला 


पोट निवडणुकीत देशभर सपाटून मार खाल्ल्यानंतर सत्तांध घमंडी राजाला उपरती झाली पंजाब, उत्तर प्रदेश व इतर राज्यात शेतकरी भाजपच्या उमेदवारांना गावात प्रवेश सुद्धा करू देत नाही आहेत हे लक्षात येताच तिन्ही कृषी कायदे मागे घेतले ही लढाई इथे थांबणार नाही, अनेक शेतकऱ्यांचे कुटुंबाची वाताहत झाली, सातशे निरपराध शेतकऱ्यांच्या बलिदानाचे मोल या सरकारला चुकवावे लागेल शेतकऱ्यांनी खुरपे हाती घेतले आहे.आता 'कमळा'चे उच्चाटन येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता करणारच आहे


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या