Ticker

6/recent/ticker-posts

3 काळे कृषीकायदे रद्द अखेर बळीराजाचा विजय मात्र लढाई अजून बाकी आहे !!

3 काळे कृषीकायदे रद्द अखेर बळीराजाचा विजय मात्र लढाई अजून बाकी आहे !!



अकोला दि. १९.११.२०२१
गेले वर्षभर दिल्लीच्या सीमांवरती "डेरा डालो घेरा डालो" म्हणत केंद्राच्या अन्यायकारी ३ शेतकरी विधेयकांच्या विरोधात, व प्रस्तावित वीज बिल कायदा विरोधात पंजाब व हरियाणा च्या शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते आणि आज केंद्रसरकारला अखेर या आंदोलनापुढे झुकावे लागले व मोदींनी हे कायदे मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे . देशभरात अखिल भारतीय  किसान सभा, सुरवातीपासून यात सहभागी होती गावागावांपासून तहसील कचेरी, जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय या सर्व ठिकाणी  किसान सभे ने हा लढा लावून धरला होताच मात्र प्रत्यक्ष दिल्लीच्या सीमेवर लढणाऱ्या शेतकऱ्यांसोबत ही  हजारो शेतकरी, महिला शेतकऱ्यांसह प्रत्यक्ष सहभाग ही घेतला महाराष्ट्र तुन नाशिक हुन २ वेळा ५००० हुन अधिक शेतकरी घेऊन सहभागी दिल्ली आंदोलन त झालो होतो. आता २७ ऑक्टोबर पासून राज्य भर शहीद किसान  कलश यात्रा राज्यभर सुरू महाराष्ट्र त सुरू करून कायद्याच्या विरोधात जनजागृती सुरू आहे. 


 ज्यात  लोकसंघर्ष मोर्चा च्या सीताबाई तडवी या संघटनेच्या लढाऊ महिला नेतृत्वाला आपले बलिदानही  दयावे लागले 
 आज शहीद सीताबाई तडवी यांच्या बलिदानाला यश आलं महाराष्ट्रातील बळी गेलेल्या सीताबाई तडविंसह देशभरातून ७०० शेतकऱ्यांनी या आंदोलनात आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे लाखीमपूर येथील सरकारनेच चिरडून टाकलेल्या शेतकऱयांची हत्या ही सर्वांच्या लक्षात आहे या सर्व बलिदान करणाऱ्या शेतकऱ्यांना स्मरण करत केंद्र सरकारला हे काळे कायदे मागे घ्यायला भाग पाडणारा देशातील बळी राजाचा जो हा विजय आहे त्याचे आम्ही स्वागत करीत आहोत मात्र लढाई अजूनही संपलेली नाही.
मोदी सरकारने शेतकरी आंदोलनाला आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न केला, आंदोलनाला बदनाम करण्यासाठी साम, दाम, दंड या सर्वांचा वापर केला गेला भाडोत्री मीडिया दिवसरात्र या आंदोलनाविरुद्ध गरळ ओकत राहिला तरीही शेतकरी आंदोलन मागे सरले नाही आंदोलनात ७०० च्या वर शेतकऱ्यांना आपले बलिदान द्यावे लागले या सर्व मृत्यूंचे पातक या सरकारवर आहे आता पंजाब व उत्तरप्रदेश च्या निवडणुका समोर असल्या तरी वर्षभर या दुराग्रही सरकारच्या समोर नेटाने अहिंसक लढाई लढत या सरकारला घुटण्यावर आणत घाम फोडला म्हणून केंद्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे जर खरंच शेतकरी हित महत्वाचे वाटत होते तर हे कायदे मागे घ्यायला वर्षभर वाट का बघीतली याचे उत्तरही सरकारने द्यायला हवे 
मुळात हे तिन्ही कायदे रद्द झाले असले तरी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला बाजारसमित्या व खाजगी व्यापाऱ्यांनी हमीभाव दिलाच पाहिजे हा प्रश्न बाकी आहे आज शेतकरी जो सर्व बाजूंनी महागाई आणि नैसर्गिक संकट या दुहेरी सापळ्यात अडकला आहे त्यातून त्याला सोडवण्यासाठी सर्वंकश कृषिहिताचे धोरण जाहीर करणे गरजेचे आहे त्यामुळे शेतकरी आंदोलनाचे मूळ प्रश्न अजूनही शिल्लक आहेत आणि त्यासाठी ही लढाई अजून संपलेली नाही.


येथील उद्योगपतींना फायदा करून देण्यासाठी मोदींसरकारने हे तीन कृषी विरोधी कायदे मध्येच येथील बळीराज्याच्या माथी मारले होते ते परतवून लावण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर हा लढा द्यावा लागला मात्र शेतकऱ्यांना हमीभाव व स्वामिनाथन आयोगाच्या शेतकरी हिताच्या शिफारशीं ची अंमलबजावणी ह्या मागण्यांसाठी हा लढा सुरूच राहील 


आज सिताबाईंचे बलिदान स्मरण करून केंद्रसरकार विरोधातील लढा यशस्वी झाल्याचा आनंद आहे आणि बलिदान करणाऱ्या तमाम शहीद शेतकऱ्यांना वंदन करत आम्ही हा विजय साजरा करत आहोत. शहीद शेतकरी च्या कुटुंब ला ५० लाख रुपये द्या १ नोकरी केंद्र सरकारने द्यावी. लखीमपूर शेतकरी चिरडून मारणारे केंद्रीय   गृह राज्यमंत्री चा राजीनामा घ्यावा. त्याच्या मुलावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत  आहोत. पुढील आंदोलन दिशा देशातील सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन ठरवतील. कामगार विरोधी कायदा रद्द करण्यासाठी शेतकरी व कामगार एकत्र लढा देतील.
जिंदाबाद !!
लढेंगे- जितेंगे !!!


आपला
 कॉम्रेड नयन गायकवाड 
अकोला किसान सभा संघटक
*उपाध्यक्ष भाकप/आयटक अकोला,
*उपाध्यक्ष वाशीम, बुलढाणा, अकोला कामगार वकील संघ 
जाहीरात व बातमी साठी संपर्क 9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या