शेतकऱ्यांना 18 तास अखंड वीज पुरवठा राज्य शासनाने करावा
अकोला
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 18 तास अखंड वीज पुरवठा राज्य शासनाने करावा. ग्रामीण भागातील रोहिणी नक्षत्र त्वरित दुरुस्त करून ग्रामीण अर्थव्यवस्थेत सोबत शेतकऱ्यांना सवलती द्याव्या अशी मागणी भाजपा शिष्टमंडळाने करून येत्या आठ दिवसात युद्धस्तरावर रोहिणी नक्षत्र ट्रान्समीटर दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार विरुद्ध आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विभागीय अभियंता यांना दिले .
आज भाजपा शिष्टमंडळाने रबी हंगाम लक्षात घेता सरकारने त्वरित पावले उचलावी वीज वितरण कंपनी यांनी शेतकऱ्यांच्या पंपाची लाईन ची कपात करू नये . तसेच रोहिणी नक्षत्र युद्धस्तरावर सुरू करा येथे आठ दिवसात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातीलसमस्या त्वरित सुरू करण्यात यावे अन्यथा वीज वितरण कंपनी व शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार विरुद्ध जनांदोलन उभारीला त्याचा संपूर्ण जबाबदारी वीज वितरण कंपनी व सहकार्य राहील असा इशारा देण्यात आला
शिष्टमंडळात तेजराव थोरात, माधव मानकर,अंबादास उमाळे शंकरराव वाकुडे रवींद्र गावंडे प्रवीण पाटील देवेंद्र देवर डॉक्टर दिलीप गावडे संजय गावंडे अनिल गावंडे, अभिमन्यू नळकांडे पंकज वाले अनिल गावंडे हिम्मत देशमुख देवेंद्र देवर किशोर कुचके, किशोर काकडे गोपाल सपकाळ विजय देवर गजानन टिकार आदींचा समावेश होता.
0 टिप्पण्या