विधी सेवा प्राधिकरणाच्या माहिती फलकाचे महानगरात ठिकाणी अनावरण
अकोला- नागरिकांना कायद्याची माहिती व्हावी, कायदेविषयक हक्क अबाधित राहावेत,पोलीस ठाणी ही कायद्याची मंदिरे झाली पाहिजेत या उदात्त हेतूने विधी सेवा प्राधिकरण मुंबईच्या वतीने राज्यभरात विविध भागातील दर्शनी भागात जनतेसाठी कायद्याच्या ज्ञानाचे फलके लावण्यात आलीत.या कायद्याच्या अधिकाराच्या मुख्य माहिती फलकाचे अनावरण औरंगाबाद येथे शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण यांच्या हस्ते व केंद्रीय कायदामंत्री किरण रिजीजु,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, न्यायमूर्ती उदय ललित, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती भूषण गवई,न्यायमूर्ती अभय ओक,मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता,राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.या सोहळ्यात ऑनलाईन विधी विश्वातील तज्ञ सहभागी झाले होते.त्याचबरोबर राज्यभरातील विविध ठिकाणीही विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून या माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले.महानगरात जिल्हा न्यायाधिश खोब्रागडे व विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या बोस यांच्या मार्गदर्शनात सिटी कोतवाली येथे विधी सेवा प्राधिकरणाच्या माहिती फलकाचे अनावरण अकोला बार असो.चे माजी सचिव,नोटरी,एड.मो. इलयास शेखानी यांच्या हस्ते तथा सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोळंके,एड तुषार शिरसाट, विधी विद्यार्थी कु वैशाली नाथनकर,दीक्षा नंदागवळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दरम्यान महानगरातील अन्य ठिकाणीही अनेक विधिज्ञांनी विधी सेवा प्राधिकरणचे हे माहिती फलक जनजागरणाचा दृष्टिकोनातून लावून त्यांचे अनावरण करण्यात आले.
0 टिप्पण्या