Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पक्षाचा जात-पात धर्म सोडून विकासाचा संकल्प - डाॅ. संजय कुटे

भारतीय जनता पक्षाचा जात-पात धर्म सोडून विकासाचा  संकल्प - डाॅ. संजय कुटे



अकोला
समाज निष्ठा, राष्ट्रनिष्ठा,   मतदारांनी प्रती निष्ठा, शेतकरी निष्ठा, विकास निष्ठा, आत्मनिर्भर निष्ठा, मानवता ,  संवेदनाशील, हे गुण भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींमध्ये असल्यामुळे जात-पात धर्म सोडून विकासाचा  संकल्प घेऊन कार्यरत भाजपा उमेदवारांना जिल्हा परिषद पंचायत समिती पोटनिवडणुकीमध्ये विजयी करा असे आवाहन प्रदेश भाजपा उपाध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले.
बाळापुर अकोट पातुर या तालुक्यात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्यासोबत जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, तेजराव थोरात विजय अग्रवाल, जयंत मसने, माधव मानकर, रमण जैन, अमोल साबळे, मनोहर रहाणे, विजय सिंह गहलोत, किशोर गुजराती, गणेश कडारकर , चंद्रकांत अंधारे, राजू उगले, रतन गिरी सुभाष सेठ अग्रवाल, सुभाष जैन, श्री कृष्ण मोर खड़े, रामजी कुचके, नितीन लांडे , तसेच भाजपा उमेदवार यावेळी उपस्थित होते.


ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण टिकवण्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला  अपयश आले असून देवेंद्र फडणवीस यांना मराठा ओबीसी आरक्षण टिकवण्यात यश प्राप्त होऊ शकते तर या सरकारला का नाही, असा सवाल आमदार कुटे यांनी उपस्थित केला. समाजसेवेची इच्छाशक्ती नाही. यांनी प्रत्येक खात्यात मध्ये सचिन वाजे निर्माण केले आहेत ‌. महाराष्ट्रात अनेक समस्या असताना त्याकडे लक्ष नाही. परंतु नबाब मलिक ते सुप्रिया सुळे यांना भाजपवर टीका करण्यासाठी वेळ आहे.  परंतु शेतकऱ्यांचे मातृशक्तीची अश्रू पुसण्याचे वेळ नाही. विद्यार्थ्यांसोबत मजाक होते. मंदिरे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. त्यामध्ये सुद्धा जाचक अटी टाकून मंदिर संस्थान ना अडचण निर्माण करण्याचा प्रकार या शासनाचा आहे. शाळा सुरू करण्याचे निर्णय घेतले परंतु त्यामध्ये शिक्षण संस्थांना व पालकांना त्रास होईल अशा अटी टाकून आपली जबाबदारी झटकून आम्ही सुरू केला असा आव आणून फार मोठे उपकार केले. अशाप्रकारे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री गर्जना करत आहे. अशी घणाघाती टीका आमदार कुटे यांनी यावेळी केली.


यावेळी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला जिल्ह्यातील परिस्थिती यावर प्रकाश टाकून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी भारिप मावस अरे भाई असल्याचा आरोप केला. भाई सब गोलमाल है. असे सांगून केवळ भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थेला बदनाम करण्याचा व तक्रारी करण्याचा प्रकार सुरू आहे परंतु भारिप-बहुजन महासंघाच्या कारभारावर केवळ माध्यमावर माध्यमावर या माध्यमात टीका करायची असा प्रकार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.  जनता भारतीय जनता पक्षाला विजयी करणार असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या