Ticker

6/recent/ticker-posts

बाळापुर मतदारसंघात दोन वर्षात किती विकासकामे झाली ते सांगा!

बाळापुर मतदारसंघात दोन वर्षात किती विकासकामे झाली ते सांगा!



👉 घोषणा देऊन नाही प्रत्यक्ष काम करण्याची मानसिकता हवी!
           आ रणधीरभाऊ सावरकर
बोरगाव वैराळे
           आता बाळापुर विधानसभा मतदारसंघातील अंदुरा, देगाव व इतर  जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषदेची पोट निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून त्यामुळे या जिल्हा परिषद मतदारसंघात येणाऱ्या गावागावात विकासाच्या घोषणाचा पाऊस पडायला गेल्या काही दिवसापासून सुरूवात झाली आहे विकासाच्या घोषणा देणाऱ्या या लोकप्रतिनिधीना दोन वर्षात किती विकासकामे केली हा प्रश्न लोकांनी विचारला पाहिजे माणूस काय बोलतो यापेक्षा त्याचे काम बोलले पाहिजे असे मत आ रणधीर सावरकर यांनी बोरगाव वैराळे येथे श्री रावसाहेब वैराळे सभागृहात आयोजित अंदुरा - निंबा जिल्हा परिषद चे भाजपा उमेदवार मंगला गणेश तायडे यांच्या प्रचारादरम्यान व्यक्त केले
     पुढे बोलताना आ सावरकर म्हणाले की बाळापुर विधानसभा मतदारसंघातील एकाही गावाला जोडणारा रस्ता धड नाही मागील दोन वर्षात जेव्हा पासून आघाडी सरकार सत्तेवर आले तेव्हा पासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सुरू केलेले विकासकामे वसुली साठी बंद पाडण्यात आली आहेत त्यामुळे या तिघाडी सरकारमधील लोकप्रतिनिधीची जितकी संपत्ती वाढली त्या प्रमाणात विकासकामे झाल्याचे दिसत नाही असे असूनही या सरकारमध्ये समाविष्ट असणारे लोकप्रतिनिधी विकासाची गंगा मतदार संघात अवतरणार असे मोठ-मोठे स्वप्न लोकांना आता जिल्हा परिषद निवडणुकीत दाखवीत असल्याचे मी ऐकत आहो या लोकप्रतिनिधीना मागील दोन वर्षात किती कामाची घोषणा केली किती कामाचं नारळ फोडले अन् किती कामे पूर्ण झाली याचा लेखाजोखा जनतेने मागितला पाहिजे कारण आपण निवडून देतो हे लोकप्रतिनिधी लग्न- मरणात फिरण्यासाठी नाही तर प्रत्यक्ष मतदारसंघातील गावखेडयातील जनतेला भेडसावणा-या समस्या सोडविण्यासाठी निवडून देत असतो आणि लोकांना भेडसावणा-या समस्या सोडविल्यास जनताच तुमच्या कामाचा वाहवाह करत फिरते म्हणून माणूस नाहीतर त्याचे काम बोलले पाहिजे 


       म्हणून जनतेने देखील विकासाची तळमळ असणाऱ्या लोकांना निवडून दिले पाहिजे असा विकासाची तळमळ आणणारा उमेदवार भाजपा ने मंगला गणेश तायडे च्या रूपाने दिला आहे या सधीचे सोने मतदारांनी केले पाहिजे
      यावेळी प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य तेजराव थोरात, अमोल साबळे, श्रीकृष्ण मोरखडे, विलास पोटे, माधव मानकर, मनिराम टाले, विजय पाटील,अशोकराव वैराळे,  भुपेंद्र राजपुत, विजय फुकट, यश सेकसरीया,विनायकराव वैराळे, पांडुरंग बाहकर, प्रदीप वाकोडे, रामराव शेळके, बाळू पाटील वैराळे, पुंजाजी अमरावते, रामदास थारकर,विलास पांडे,श्रीधर रोहणकार, रामभाऊ सुर्यवंशी, प्रमोद वैराळे, आशिष नि वैराळे,गणेश बोचे, सुनील गावंडे, पुरूषोत्तम ठाकरे,हरिभाऊ दांगटे, माणिकराव वानखडे, बाळू वानखडे, नंदु तायडे,जगन्नाथ गावंडे, देवेंद्र घेंगे,आनंद पुंडे,मंगेश भिवटे ,गजानन रोहणकार, गोपाल भगत आदीसह बहुसंख्य नागरिक कार्यक्रमात उपस्थित होते


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या