निश्चीत झाले,शाळा सुरु होणार - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
टास्कफोर्स ने दिलेल्या सुचनांचे पालन करत येत्या 4 ऑक्टोंबर पासून शाळा सुरु करणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली आहे. 4 ऑक्टोंबरपासून टास्क फोर्स ने दिलेल्या सुचनांचे पालन करत ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी आणि शहरी भागातील 8 वी 12 वी पर्यंतची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळा सुरु झाली तरी शाळांमधील खेळ सुरू करणार नसल्याचही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. टास्कफोर्स ने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन केले जाणार असून शाळा सुरु करताना शिक्षकांनाही टास्क फोर्स ने दिलेल्या सुचनांबाबतचे ट्रेनिंग दिले जाणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांनी कशी काळजी घ्यावी याबाबत देखील नियमावली तयार करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दोन लस (Vaccine) घ्याव्या असंही SOP मध्ये असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, सुरक्षेची काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात येईल आणि यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ही सूचना दिल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना घरात आल्यावर कपडे बदलणे, मास्क, याबाबत सूचना दिल्या जातील विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी असेल तर पालकांना आणि शिक्षकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येतील. मुलांचे टेम्प्रेचर नेहमी तपासले जावे तसेच ज्या शाळा कोविड सेंटर म्हणून वापरल्या आहेत त्याठिकाणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशा सुचनांसह, शाळेत विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या सहमतीनेच उपस्थित करावे असेही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. पालकांची सहमती महत्वाची आहे. दरम्यान, शाळा सुरु केल्या तरी जे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाहीत त्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येईल असही यावेळी शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली शाळा सुरु होणार हे निश्चित झाले असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आनंदाचे वातावरन निर्माण झाले आहे.
0 टिप्पण्या