Ticker

6/recent/ticker-posts

दप्तर दिरंगाईला कारणीभूत कर्मचारी व अधिकारी यांच्या कारवाई करा - किरणराव सरनाईक

दप्तर दिरंगाईला कारणीभूत कर्मचारी व अधिकारी यांच्या कारवाई करा - किरणराव सरनाईक


अमरावती विभागातील विविध थकीत देयकांसंदर्भात होत असलेली अनियमितता व दप्तर दिरंगाईला कारणीभूत कर्मचारी व अधिकारी यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा - किरणराव सरनाईक,शिक्षक आमदार,अमरावती विभाग.
---------------------------------------------
🌀लक्षवेधी प्रश्नांद्वारे किरण सरनाईक यांनी वेधले शासनाचे लक्ष.🌀
---------------------------------------------
🔸 शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांचे शिबिर आयोजित करून थकीत देयके निकाली काढण्याचे आश्वासन.🔹
---------------------------------------------
🔸विभाग स्तरावर समिती गठित करून कर्मचाऱ्यांकडून होणारी अनियमितता व दप्तर दिरंगाईची चौकशी करून कारवाई करण्याचे सुद्धा दिले आश्वासन🔹
---------------------------------------------
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातून यावर्षी थकीत देयकां संदर्भात अनेक तक्रारी अमरावती विभागीय शिक्षक संघ कार्यालय वाशिम येथे प्राप्त झाल्या होत्या. तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालय येथील सभेदरम्यान शेकडो निवेदने मिळाले होते.त्याची दखल घेत अमरावती विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार श्री किरणराव सरनाईक यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात थकीत देयका संदर्भात लक्षवेधी मांडून या समस्या कडे शासनाचे लक्ष वेधले.

         सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे...

         मागच्या चार ते पाच वर्षापासून विविध प्रकारचे देयके थकीत आहेत. या संदर्भात कर्मचाऱ्यांना नकारात्मक प्रतिसाद मिळतो. कधी कधी तर प्रस्ताव गहाळ झाले असेही सांगितले जाते व नव्याने प्रस्ताव सादर करण्यासाठी सूचित केले जाते. बऱ्याचदा वारंवार त्रुटी काढल्या जातात व कर्मचाऱ्यांना परतवून लावले जाते.याबाबतीत आज दिनांक 3 जुलै रोजी श्री किरणराव सरनाईक यांनी लक्षवेधी प्रश्न सादर करून शासनाकडे संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
         मा.दीपकजी केसरकर साहेब यांनी आपल्या उत्तरामध्ये देयके थकीत नाहीत तसेच लाच लुचपती संबंधि लेखी तक्रार नाही. अशा आशियाचे उत्तर दिल्यानंतर श्री किरण राव सरनाईक यांनी मागील वर्षी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईचा दाखला दिला. तसेच कर्मचारी निष्काळजी आहेत, दप्तर दिरंगाई करतात व त्यांच्याकडून सेवा हक्क हमी कायद्याची सतत पायमल्ली होते. याकडे लक्ष वेधले. श्री किरणराव सरनाईक यांनी थकीत देयके निकाली काढण्यासाठी शिबिराचे आयोजन करावे. तसेच निष्काळजी व दप्तर दिरंगाई करणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी समिती गठित करण्याची मागणी केली आहे. मा. श्री दीपकजी केसरकर साहेब यांनी समिती गठित करण्याचे आश्वासन दिले असून, थकीत देयके निकाली काढण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याचे सुद्धा आश्वासन दिले आहे.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या