संविधान वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हा पर्याय आहे - ऍड बाळासाहेब आंबेडकर
अकोला दि. ०९
शहरातील गुडधी येथील
गोंधळी समाज सामाजिक सभागृह येथे
वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंधळी समाज बांधवांच्या वतीने आयोजित गोंधळी समाज संवाद मेळावा संपन्न झाला. गोंधळी समाज हा परंपरावादी असुन संस्कृतीला जन्म देणारा आहे. गोंधळी समाज हा लोकसंख्येच्या प्रमाणात अल्प असल्याने भाजपा आज रोजी जी कुरघोडी करत आहे ते थांबविने महत्त्वाचे आहे. सोबतच संविधानाने गोंधळी समाज बांधवांना जे अधिकार दिलेत ते अबाधित ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हा पर्याय आहे तो तुम्ही निवडाल अशी अपेक्षा ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली..
यावेळी गोंधळी समाजातील नामवंत प्रकाश भागवत, योगेश गिते, सुनील मराठे,बंडु नागे, गजानन गिते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ऍड श्रीराम सोनोने यांनी भुषविले. प्रास्ताविक गणेशराव इंगोले यांनी सुत्रसंचलन गजाननजी गवई,
तर आभारप्रदर्शन प्रदीप मराठे यांनी केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, मिलिंद इंगळे,
सरलाताई मेश्राम,संजय किर्तक, नितेश किर्तक, गजानन सुरवाडे उपस्थित होते....
0 टिप्पण्या