Ticker

6/recent/ticker-posts

विहीर मंजुरीसाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही

खेट्री येथे विहीर मंजूर करण्याच्या नावावर हजारो रुपयांची लुबाडणूक


विहीर मंजुरीसाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही


नासीर शेख 
पातूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबास सिंचन विहिरीचे कामे मोहीम स्वरूपात ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यासंदर्भात शासनाचे आदेश आहे. त्यानुसार प्रत्येक ग्राम पंचायतीला 15 सिंचन विहिरीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसे प्रस्ताव जिल्हा परिषदेने ग्राम पंचायत मार्फत मागितले आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर संबंधित शेतकऱ्यांनी अर्ज भरावे,विहीर मंजुरीच्या नावावर खेट्री येथे प्रतिनिधी व दलाल यांच्याकडून प्रत्येक लाभार्थ्याकडून 25 ते 30 हजार रुपयांची लुबाडणूक केल्याचा प्रकार सुरू आहे. ग्राम पंचायतला प्रत्येक शेतकऱ्यांनी अर्ज भरावे, त्यातील 15 लाभार्थ्यांची निवड करून त्यांना विहिरीचे लाभ मिळणार आहे. अर्जानुसार विहीर जिल्हा परिषदेकडून मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतिनिधी व दलाल यांना हजारो रुपये देण्याची गरज नाही,यापूर्वी प्रतिनिधी व दलाल यांच्याकडून घरकुलाच्या फाईली ऑनलाईन करण्याच्या नावावर शेकडो पात्र नसलेल्या लाभार्थ्याकडून प्रत्येकी 500 असे हजारो रुपयांची वसुली करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता,


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या