जनता भाजी बाजार प्रवेशद्वाराला "स्वछता गृह "म्हणुन घोषित करा !
अकोला मनपा म्हटले म्हणजे डोळ्यापुढे पटकन चित्र उभे राहते ते म्हणजे "अस्वच्छता आणि सावळा गोंधळ " याचीच प्रचिती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्येल्या भाजी बाजाराची !
मध्यवर्ती बस स्थानका समोर शहरच्या मध्यवर्ती भाजी बाजाराचे ठिकाण जे "जनता भाजी बाजार "नावाने ओळखल्या जाते. शहराच्या पुर्व भागातील जास्तीत जास्त नागरिक याच ठिकाणांहुन भाजीपाला खरेदी करतात.
अकोला मनपा म्हटले म्हणजे डोळ्यापुढे पटकन चित्र उभे राहते "अस्वच्छता आणि सावळा गोंधळ " याचीच प्रचिती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्येल्या भाजी बाजाराची ! जुने बस स्थानका समोर शहरच्या मध्यवर्ती भाजी बाजाराचे ठिकाण जे "जनता भाजी बाजार "नावाने ओळखल्या जाते. शहराच्या पुर्व भागातील जास्तीत जास्त नागरिक याच ठिकाणांहुन भाजीपाला खरेदी करतात.
जनता भाजी बाजारात साचलेली घाण, आणि घाण पाणी निचऱ्याची कोणतीच व्यवस्था मनपा प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळं बाजारात नेहमीच घाणीचे साम्राज्य असते. जनता भाजी बाजाराचे प्रवेशद्वाराची अवस्था स्वछता गृहा पेक्षाहीवाईट झालेली आहे. भाजी बाजारात प्रवेश केल्यानंतर वाहन पार्किंग साठी जाताना नागरिक प्रवेशद्वारावरच लघुशंकेसाठी वापर करताना दिसतात. नागरीकांना अतिशय घाण आणि उग्र दर्पाला सामोरे जावे लागते. महापालिकेने यावर कोणतेही ठोस कारवाई न केल्यामुळे तसेच कचरा नियमितपणे उचलला नसल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. जनता भाजी बाजारात दुर्गंधी पसरत आहे. या संदर्भात अनेकवेळा व्यापाऱ्यांनी महापालिका आयुक्तांशी बाजार परिसराची नियमित साफसफाई करण्याबाबत चर्चाही केली होती, मात्र यावर ठोस तोडगा निघू शकला नाही. आवारात साचणारा कचरा रोज नियमितपणे उचलला गेल्यास ही समस्या सुटू शकते. मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. या भागाची कधी ना सफाई, ना ब्लिचिंग पावडर, ना फवारणी केलेलीही आढळुन येत नाही. संबंधित विभागाचे आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांना ही दिसत नाही की जाणीव पूर्वक दुर्लक्ष करतात, याची शहा निशा होणे गरजेचे आहे. याची चौकशी मनपा आयुक्त जातीने लक्ष घालुन करतील काय? त्याच प्रमाणे संबंधित अधिकारी /कर्मचाऱ्यांवर ठोस कार्यवाही करुन नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ थांबवतील काय ? असा सवाल सुज्ञ नागरिक करीत आहेत.
0 टिप्पण्या