Ticker

6/recent/ticker-posts

गायत्री बालसुधारगृहातून सात मुली पळाल्या

 गायत्री बालसुधारगृहातून सात मुली पळाल्या 


अकोला शहरातील तुकाराम चौक परिसरात असलेल्या गायत्री बालसुधारगृहातून सात मुली पळून गेल्याची भयंकर घटना आज शनिवारी पहाटे उजेडात आली. याप्रकरणी खदान पोलिसांत स्टेशन अकोला येथे बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली असून अकोला खदान पोलीस तपास करीत आहेत. काल दुपारपर्यंत यातील दोन मुलींचा शोध लागला आहे. बालसुधारगृहातील मुले पळून जाण्याच्या अशा अनेक घटना घडल्या नेहमीच पहावयास मिळते. त्याच्यामुळे बालसुधारगृहाचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अकोला येथील गायत्री बालसुधारगृहात अनेक अल्पवयीन मुली आहेत. अपहरण प्रकरणातील सात अल्पवयीन मुलींना एकाच खोलीत ठेवण्यात आले होते.  आज शनिवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास रुमची लोखंडी ग्रीलची खिडकी तोडून बाहेर उड्या उड्या मारून ह्या सातही मुली पळून गेल्या. पहाटे 'योगा' करण्याची वेळ झाली असता, येथील महिला कर्मचारी मुलींना झोपेतून उठवण्यासाठी गेली असता, रूमचा दरवाजा आवाज देऊन वाजविला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर ग्रिलची खिडकी तुटल्याचे निदर्शनास आले. यानंतर खोलीचा दरवाजा बंद ग्रिल खिडकी तुटलेली म्हणजे मुली पळवून गेल्याच समजले. यासंदर्भात लगेच कर्मचाऱ्यांनी खदान पोलिस स्टेशन गाठून आपल्या बालसुधारगृहातील सात मुली पळून गेल्याची तक्रार दिली. बेपत्ता मुलींचा शोध खदान पोलिसांनी सुरू केला आहे. त्यामधे दुपारपर्यंत दोन मुलींचा शोध लागला असुन, पळून गेलेल्या सात मुलींपैकी पाच मुली अकोला जिल्ह्यातील तर दोन मुली बाहेरील जिल्ह्यातील असल्याचे समजते. सापडलेल्या दोन मुलींना बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.  यावळी गायत्री बालसुधारगृहातून अनेकदा मुले पळून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळ येथील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला चालला असून संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज भासत आहे. यावरून बालसुधारगृहातील गलथान कारभार स्पष्ट दिसत आहे.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या