Ticker

6/recent/ticker-posts

४ दिवसांत राज्यावर आस्मानी संकट, बर्‍याच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

४ दिवसांत राज्यावर आस्मानी संकट, बर्‍याच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता



मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असून उन्हाची तीव्रता देखील कमी झाली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार येत्या चार दिवसांमध्ये विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असुन काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडेल, वादळी वारेही वाहू लागेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. ७ व ८ मार्च रोजी आकाश ढगाळ राहील. 


८ मार्च औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, काढणीस तयार असलेल्या गहू, हरभरा, ज्वारी पिकांची काढणी शेतकऱ्यांनी करून घ्यावी. तसेच पिक सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे. विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात ९ ते १५ मार्चपर्यंत कमाल तापमानात मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या