अकोल्यात विविध ठिकाणी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
अकोला
सकारात्मक बाबींचा विचार करून उद्दिष्ट ठेवून सामाजिक दायित्व लक्षात घेऊन मा जिजाऊ यांनी स्वराज्य साठी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडून तसेच स्वामी विवेकानंदांनी आपले गुरू परम्हांस रामकृष्ण यांच्या अध्यात्म संस्कृती व विश्वगुरू भारताला बनवण्यासाठी भारताची ओळख सगळ्या जगाला निर्माण केली अशा स्वामी विवेकानंद यांचा आदर्श युवकांनी ठेवून संत गाडगेबाबांना अभिप्रेत कार्य समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळून देण्यासाठी मोहोकार सारख्या युवकाने कठीण परिस्थितीत समाजसेवा सुरू केली ही अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले.
गाडगे नगर येथे भाजपा दक्षिण-पश्चिम मंडळाच्यावतीने अमोल मोहोकार यांच्या पुढाकाराने आयोजित विश्वकर्मा श्रमिक ई कार्ड , पॅन कार्ड शिबिराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोल गोगे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अमोल गीते दिलीप मिश्रा गिरीश जोशी गिरीश तिवारी अक्षय गंगाखेडकर, संजय गोडा, निलेश नीनोरे, हरिष अलीम चंदनी, विलास अनासने, सुनील कांबळे हेमंत शर्मा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज श्री राम, मा जिजाऊ, गाडगे बाबा, कर्मयोगी संत गजानन महाराजांचे विश्वस्त स्वर्गीय शिव शंकर पाटील यांना अभिवादन करण्यात आला. यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी का सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आला. ७३२ नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे संचालन हेमंत शर्मा तर प्रास्ताविक एक एडवोकेट लखन बडदिया, तर आभार प्रदर्शन विजय चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीअमोल गोगे, दिलीप मिश्रा, सुनिल कांबळे, सुभाष वर्मा, अमोल गीते,विजय चौधरी, हेमंत शर्मा,मंगेश सावरकर, किरण जव्हेरी, राजू पेढरी, अभिषेक भगत,गजानन वाडेकर,गजानन बाहेकर, सुनील बाठे, गणेश श्रीनाथ,विशाल गमे,दीपक कराळे, सचिन साहू, मनिष प्राणझडे, शिवा राऊत, अंकुश राऊत, सागर राऊत, शेखर मोहोकर,जय गावंडे, लकी डोंगरे, अमोल जव्हेरी, अभय बनकर, वैभव राऊत, सागर बनकर, अक्षय मासोदकर, मनोज घोलप, वैभव शेळके, करण जव्हेरी, शिवा जगदाळे, राहुल डोंगरे, निलेश गायकवाड, पवन ओवाळ, सनी सूर्यवंशी, कैवल्य मुळे, अमोल घोलप,शशांक जव्हेरी, गणेश भोसले ,गोलू शुर्यवांशी, शुभम पाटील, सचिन साहू ,राज यादव , राज लांडगे, आदींनी अथक परिश्रम घेतले
श्री.सखाराम महाराज विद्यालय प्रांगनामध्ये स्वामी विवेकानंद जयंती
आज दि.12/01/2022, बुधवार रोजी सायंकाळी 4-50. वाजता कबड्डीची पंढरी ग्राममंडळ,केळीवेळी ता.अकोट जी.अकोला येथे श्री.सखाराम महाराज विद्यालय प्रांगनामध्ये स्वामी विवेकानंद जयंती नेहरू युवा मंडळाच्या वतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
तरी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या वतीने विद्यालयातील कबड्डीच्या मैदानाचे पूजन करण्यात येऊन, दि.1/1/2022, रोजी रनींग/उंच उडी/व कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक पटकावून 7.सुवर्ण पदक विजेती 12.वीच्या मुलींच्या टीमचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
तरी कार्यक्रमाला गावच्या ग्राममंडळाचे अध्यक्ष श्री.किशोरभाऊ बुले(गुरुदेव), श्री.संतोषभाऊ शिवरकर(पं.स.सदस्य), श्री.मुकुंदराव बकाल(अध्यक्ष,हनुमान क्रीडा संकुल केळीवेळी), श्री.वासुदेवराव बावणे(माजी खेळाडू हनुमान मंडळ केळीवेळी), श्री.माधवराव बकाल सर, विद्यालयाचे कर्मचारी श्री.विजयभाऊ अंभोरे आणि शुभमभाऊ भालेराव(अकोट तालुका समन्व्यक,नेहरू युवा केंद्र अकोला उपस्थित असून नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
खेंडकर ज्ञानगंगेमधे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव व युवादिन साजरा
अकोला : सरस्वती नगर, जुना वशीम बायपास, अकोला येथील खेंडकर ज्ञानगंगेमधे आज १२ जानेवारी २०२२ रोजी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव व युवादिन साजरा करण्यात आला. शाळेचे संस्थाअध्यक्ष आणि कर्मचारी यांच्या उपस्थीतीत मोठ्या उत्साहात आज राजमाता जिजाऊ जन्मोत्सव व युवादिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भाऊसाहेब खेंडकर यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी विष्णुपंत खेंडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. निलेश खेंडकर उपस्थीत होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्व. यमुनाबाई खेंडकर प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक व महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष मा. अल्केश खेंडकर यांची प्रार्थनीय उपस्थीती होती. शाळेतील शिक्षक गोपाल वानखडे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन केले या प्रसंगी अध्यक्षांनी राजमाता जिजाऊ यांनी ज्याप्रकारे स्वराज्य रक्षक शिवाजी महाराज घडविले, तसेच आज प्रत्येक आईने आपल्या मुलाला घडविणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. तसेच आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच युवा दिन आहे, प्रत्येक युवकाने त्यांचे स्मरण करावे, असं मत व्यक्त केले. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक आशा काळे, सुरेश सुरले, प्रज्ञानंद थोरात, प्रशांत काळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशास्वीतेसाठी शाळेतील इतर शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
*स्वामी विवेकानंद यांचे तथागत बुद्ध आणि बौद्ध धर्मा विषयीचे १२ विचार ....*
*“बुद्धांच्या ह्रदयाचा एक लक्षांशही मला लाभला तर मी स्वत:ला धन्य मानले असते.”*
*“अवघ्या जगामध्ये बुद्धच असे एकमेव महापुरूष आहेत की ज्यांनी यज्ञातील पशूहत्या थांबविण्यासाठी यज्ञात पशूच्या ऐवजी स्वत:चे जीवन बळी देण्याची तयारी दाखवली.”*
*“बौद्ध धर्म हा जगातील पहिला प्रचारक धर्म होता आणि त्याने त्या काळातील सगळ्या सभ्य जगात प्रवेश केला, आणि तरीही या धर्माच्या प्रचारार्थ रक्ताचा एक थेंबही सांडावा लागला नाही.”*
*“बुद्ध हे इतर सर्व धर्माचार्यांपेक्षा अधिक साहसी, अधिक प्रांजळ होते. ते म्हणाले होते की, "कोणत्याही शास्त्रावर विश्वास ठेवू नका. वेद हे थापाडे आहेत. शास्त्रे जर माझ्या अनुभूतींशी वा उपलब्धींशी जुळतील तर ते त्या शास्त्रांचेच भाग्य. सर्वात श्रेष्ठ शास्त्र स्वत: मीच आहे. यागयज्ञ आणि देवदेवतार्चन निष्फळ होय'' जगाला सर्वांग सुंदर नीतिशास्त्रीची शिकवण देणारे बुद्ध हेच पहिले मानव होते.”*
*“बुद्ध हे एक थोर समाज सुधारक होते. भारतातील थोर तत्त्वज्ञांमध्ये बुद्ध हेच असे एकमेव होते की ज्यांना जातिभेद मान्य नव्हता... इतर सर्वच दार्शनिकांनी वा तत्त्वज्ञांनी थोड्याबहूत प्रमाणात सामाजिक अंधविश्वासांना कुरवाळलेच आहे. समाजाच्या खुळचट समजुतींची खुशामत केली आहे.”*
*“भगवान बुद्धांसारखा त्यागी महापुरूष या अवनीतलावर अन्य कुणी झाला नाही.”*
*“मानवामानवातच काय पण मनुष्य आणि पशू यांमध्ये देखील जी विषमता आढळते तिचा बुद्धांनी निषेध केला. ‘सर्व जीव समान आहेत’ असा उपदेश बुद्ध करीत. बुद्धांनीच सर्वप्रथम मद्यपाननिर्षधाचा पुरस्कार केला आहे.”*
*“जगातील सर्व आचार्यांमध्ये वा धर्म संस्थापकांमध्ये बुद्ध हे एकटेच असे आहेत की ज्यांच्या कार्याला बाहेरील कोणताही हेतू प्रेरक नव्हता. इतर सर्वांनीच आपण ईश्वरावतार, ईश्वरदूत, ईश्वरपुत्र आहोत अशी घोषणा केलेली आहे, आणि ते असेही सांगून गेले आहेत की, त्यांच्यावर जो विश्वास ठेवील तोच स्वर्गी जाईल, मुक्त होईल. पण बुद्ध मृत्यूच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हेच म्हणत असत, “कुणीही तुम्हाला मुक्त होण्यासाठी साहाय्य करू शकणार नाही. स्वत:च स्वत:ला साहाय्य करा, स्वत:च्याच प्रयत्नांची मुक्तिलाभाची कास धरा.” स्वत: संबंधी ते म्हणत, "बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशाप्रमाणे अनंत ज्ञानसंपन्न; मी सिद्धार्थ गौतमाने ती अवस्था प्राप्त करून घेतली आहे. तुम्हीही जर तिच्यासाठी प्राणपणास लावून प्रयत्न कराल तर तुम्हालीही ‘बुद्धत्व’ प्राप्ती होऊ शकेल." ”*
*“भारतात आज हे जे संन्याशांचे मठ वैगरे दिसतात ते सारे बौद्ध धर्माच्या अधिकाराखाली होते. हिंदूनी आता त्या साऱ्यांना आपल्या रंगाने रंगवून स्वत:चे करून घेतले आहे. बुद्धांपासूनच यथार्थ संन्यासाश्राचा पाया रचला गेला. त्यांनीच संन्यासाश्राच्या मृत सांगड्यात प्राण ओतले.”*
*“बुद्धांचा हजारावा अंश माझ्यात असता तर मी स्वत: ला धन्य समजलो असतो.”*
*“बुद्धांनी प्रचंड शक्तीशाली सत्याची शिकवण दिली. सर्व जगाला त्यांनी भेदभाव न करता शिकवले, कारण ‘मानवाची समानता’ हा त्यांच्या महान संदेशांपैकी एक संदेश होता. सर्व मानसे समान आहे, याला काही अपवाद नाही.”*
*“बुद्ध हे समतेचे महान उपदेशक होते,आध्यात्मिकता प्राप्त करून घेण्याचा प्रत्येक पुरूषाला व स्त्रीला सारखाच हक्क आहे,ही त्यांची शिकवण होती.”*
*संदर्भ - भगवान बुद्ध आणि त्यांची शिकवण : लेखक - स्वामी विवेकानंद*
0 टिप्पण्या