प्रा.भाई एन.डी. पाटील यांच्यासारखे त्यागी नेतृत्व चमचमत्या दुनियेत मिळणे दुर्मिळ-प्रा.राजाभाऊ देशमुख
—————————————पुरोगामी चळवळीचे आधारवड प्रा.एन.डी.पाटील यांना सर्व संघटनांची श्रद्धांजली
——————————————
अकोला— खडतर आयुष्याच्या ९३व्या वर्षापर्यंत महाराष्ट्राच्या सामाजिक -राजकीय-आर्थीक चळवळीचे केवळ साक्षीदार नाही तर त्या चळवळीत आघाडीवर सहभागी असलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते डाॅ.प्रा.भाई एन.डी. पाटील यांच्यासारखे कणखर,दमदार,निर्भिड,निस्पृह,त्यागी नेतृत्व वर्तमान चमचमच्या दुनियेत दुर्मिळ असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.राजाभाऊ देशमुख यांनी केले.
डाॅ.प्रा. भाई एन.डी. पाटील यांच्या दु:खद निधनानिमित्त सर्व पक्षीय ,संस्था,संघटना व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वतीने आयोजित श्रद्धांजली सभेत बोलत होते.महाराष्ट्र अंनिसचे राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.संजय तिडके यांनी कोरोना नियमांचे पालन करीत निवडक लोकांच्या उपस्थितीत ही आँनलाईन आदरांजली सभा संपन्न होत असल्याची माहिती प्रास्ताविकातुन दिली.
शेकाप चे मुर्तिजापूर तालुका चिटणीस भाई विजय गावंडे यांनी
—————————————— प्रा. एन.डी.पाटील विरोधी पक्षनेता,सहकार मंत्री राहुन देखील साध्या एस टी प्रवास करायचे,जामठी सारख्या छोट्याशा गावी मेट्याडोरने जाऊन सभा घेतली, कार्यकर्त्याची आस्थेने चौकशी करायचे असे त्यांचे कतृत्व कार्यकर्त्यासाठी अनमोल ठेवा असल्याचे भावोद् गार काढले.
वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष गोवर्धनदादा खवले म्हणाले की
--------------------------------------- भाईंचे भाषण कितीही ऐकले तरी एकतच राहावे वाटत असे,त्यांच्या भाषणात सामान्य माणसाची नाळ जुळलेली असायची.रोजच्या जगण्याची व्यथा भाईंनी विधीमंडळाच्या पटलावर ठेवली.कष्टकरी,शेतकरी चळवळीला भाईंचा आधार होता.
भाकपचे जिल्हा सचिव काॅ.रमेश गायकवाड यांनी
-------------------
प्रा.एन.डी. पाटील यांच्याशी जुळलेल्या आठवणींना उजाळा दिला.भाई मधुकर उतखडे आजारी असल्याचे समजताच वेळात वेळ काढुन त्यांच्या घरी पोहचले,चौकशी केली.सामान्य कार्यकर्त्याची दखल घेणारे नेते हल्ली दुरापास्त असल्याचे सांगीतले.आयटक,कामगार चळवळीच्या वतीने त्यांनी आदरांजली वाहिली.
शेकापचे जिल्हा चिटणीस
भाई दिनेश काठोके यांनी
----------------------------------------
प्रा. एन.डी. पाटील म्हणजे अत्यंत कडक शिस्तीचा माणुस .शेतकरी कामगार पक्ष असो की विधीमंडळाचे कामकाज प्रत्येक ठिकाणी भाईच्या कतृत्वाची छाप पडली.
शेकापचे विदर्भ चिटणीस भाई प्रदीप देशमुख
-------------------- श्रद्धांजली वाहतांना म्हणाले की भाई एन.डी. पाटील आपले अख्खे आयुष्य निष्ठेने,विचाराने जगले.कधीही तत्वाशी तडजोड केली नाही.ते आपल्या निर्णयावर ठाम असायचे.फाटक्या ,सर्वसामान्य माणसाच्या हक्काची लढाई भाई अखेरपर्यंत लढले.अशा महामानवाचा सहवास आम्ही सर्जनशील जीवनाची शिदोरी समजतो.
महादेवराव भुईभार अध्यक्षीय भाषणात म्हणाले की
प्रा.एन.डी. पाटील शेतकरी चळवळीत आघाडीचे कार्यकर्ते होते.जळगाव ते नागपूर दिंडीत बाभुळगाव येथे दौर्यात चप्पल तुटली तरी कुरणखेडपर्यंत पायाला रुमाल बांधुन चालत गेले.असा संघर्षशील नेता आता होणे नाही.त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करणे हीच भाईंना आदरांजली असल्याचे सांगीतले.
सभेचे संचालन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस बबनराव कानकिरड यांनी केले. सर्वश्री प्रभाकर सनगाळे,ज्येष्ठ सर्वोदयी वसंतराव केदार,सुनिल मोडक,किशीराम मारोती साबे,संतोष संपतराव देशमुख,भाकप चे स्टेट कौंशील मेंबर काॅ.नयन गायकवाड,शेकापचे भाई अँड.गजानन पाटील,विजय मोडक, संजय चिंचोलकर,रामभाऊ रोडे,सुहास अग्नीहोत्री,सतीश साहेबराव भांबेरे,आकाश इंगळे,प्रा.दत्तात्रय भाकरे यांची याप्रसंगी उपस्थिती होती.आँनलाईन श्रद्धांजली सभेत शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.भाई एन.डी.पाटील अमर रहे,काॅ.पाटील साहब को लाल सलाम!लाल सलाम!!अशा घोषणांनी परिसर निनादला.
0 टिप्पण्या