महात्मा जोतीराव फुलें यांच्या समाज व राष्ट्र निर्माणासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा- जिल्हा भाजपाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर
अकोला
ज्योतिबा फुले यांनी समता मानवता सोबत शिक्षणाचे महत्त्व विषद करून बहुजन समाजाला मानाचे स्थान प्राप्त करून दिले त्यांचे विचार आचार जीवनामध्ये अंगीकार करून समाज व राष्ट्र निर्माण होत प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा असे आवाहन जिल्हा भाजपाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
भाजपा कार्यालयात महापौर अर्चना ताई मसने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात श्रावण इंगळे, रामदास तायडे, माधव मानकर, संजय गोड फोडे, जयंत मसने, रामेश्वर वानखडे, संतोष पांडे राजेंद्र गिरी अंबादास उमाळे, बाळासाहेब आपोतीकर, अक्षय गंगाखेडकर, संजय गोडा, संजय जिरापुरे, डॉक्टर विनोद बोर्डे, धनंजय धबाले गणेश अंधारे संजय बडोणे, राहुल देशमुख, एडवोकेट देवाशीष काकड, चंदा शर्मा उकंडराव सोनवणे, निलेश नीनो रे, उमेश गुजर, मनीराम टाले योगिता पावसाळे गीतांजली शेगोकार सुमन ताई गावंडे सारिका जयस्वाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते
यावेळी आमदार गोवर्धन शर्मा यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच विजय अग्रवाल तेजराव थोरात महापौर अर्चनाताई मसने यांची समयोचित भाषणे झाली यावेळी त्यांना अभिवादन करण्यात आले . कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी, प्रास्ताविक जयंत मसने तर आभार प्रदर्शन मिलिंद राऊत यांनी केले
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या